You are here

शहरीकरण आणि शाश्वत विकास तज्ञ माधव पै हे डब्ल्यूआरआय इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्त

शहरीकरण आणि शाश्वत विकास तज्ञ माधव पै हे डब्ल्यूआरआय इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्त

२1 एप्रिल २०२३, मुंबई: शाश्वत विकास तज्ञ श्री. माधव पै यांची डब्ल्यूआरआय इंडियाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नेमणूकीची घोषणा करण्यात आली आहे. त्यांच्या नवीन भूमिकेत पै संस्थेचे धोरण, कामकाज आणि उपक्रमांचे नेतृत्व आणि देखरेख करतील. पै गेल्या काही महिन्यांपासून अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही कार्यरत होते.त्यांनी संस्थेसोबत १५ वर्षे काम केले आहे आणि संस्थेचे धोरण, रचना आणि विकास यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. माजी. ईओ आणि सध्या संस्थेचे वरिष्ठ सल्लागार असलेल्या डॉ. ओ.पी. अगरवाल यांच्यानंतर त्यांची नियुक्ती झाली आहे. जागतिक वसुंधरा दिन २२ एप्रिल रोजी साजरा होणार असतानाच ही घोषणा करण्यात आली आहे. कमी कार्बन अर्थव्यवस्थेकडे नेण्याच्या प्रक्रियेत भारताला चालना देण्यासाठी भारतीय शहरे, अन्नसुरक्षा जमीन, पाणी आणि ऊर्जा व्यवस्था यांच्यात परिवर्तन घडवून आणणाऱ्या प्रकल्पांवर डब्ल्यूआरआय इंडिया काम करत आहे.

सस्टेनेबल सिटीज प्रोग्रॅमचे (शाश्वत शहर कार्यक्रम) कार्यकारी संचालक म्हणून पै यांच्या नेतृत्वाखाली, डब्ल्यूआरआय इंडियाने शहरी वाहतूक, शहरी विकास आणि इलेक्ट्रिक दळणवळण यासंबंधी राष्ट्रीय आणि उप-राष्ट्रीय धोरणांची माहिती देण्यास मदत केली. यामध्ये मोटार वाहन सुधारणा कायदा, राष्ट्रीय इलेक्ट्रिक बस कार्यक्रम आणि ग्रीन हायड्रोजन मिशन यांचा समावेश आहे. या काळात पै यांनी बंगळुरू महानगरपालिकेची पुनर्रचना, मुंबई स्ट्रीट लॅब, मुंबई क्लायमेट अॅक्शन प्लॅन, सुरत क्लीन एअर प्लॅन आणि शहर बस प्रणालीसाठी तंत्रज्ञान रोल-आउट उपक्रमांसाठी सरकारी संस्थांसोबत भागीदारी करण्यासाठी कार्यक्रमाच्या पोर्टफोलिओचा विस्तार करण्यास मदत केली.

संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पै यांचे स्वागत करताना इंडिया रिसोर्सेस ट्रस्टच्या मंडळाचे अध्यक्ष श्री. जमशीद गोदरेज म्हणाले, "माधव यांनी सस्टेनेबल सिटीज प्रोग्रॅमसाठी जसे कार्य केले तसे ते संस्थेसाठी करत राहतील याची मला खात्री आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कल्पनांना कृतीत रूपांतरित करण्यासाठी आणि आपली वसुंधरा आणि तिच्यावर राहणाऱ्या लोकांसाठी परिवर्तनात्मक उपाय तयार करण्यासाठी एक मजबूत, सहयोगी आणि समर्पित प्रयत्न साकार होतील असा मला विश्वास आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने सक्षम आणि सामाजिकदृष्ट्या न्याय्य विकासाला चालना देण्यासाठी आपण आपल्या मार्गावर सुधारणा करत राहू याची खात्री करण्यासाठी सिस्टम डिझाइनबद्दलचे त्यांचे ज्ञान, नेतृत्व पदावरील अनेक वर्षांचा अनुभव तसेच संस्थेशी असलेला त्यांचा दीर्घकालीन सहयोग याचा उपयोग होईल अशी माझी भावना आहे."

यापूर्वी वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटमध्ये EMBARQ कार्यक्रमाचे संचालक म्हणून पै. इंदूर बस रॅपिड ट्रान्झिट (BRT), राहगिरी आणि बसकारो सारख्या महत्त्वाच्या उपक्रमांना पाठबळ देण्यास जबाबदार होते. ते प्रथितयश लेखक आहेत आणि त्यांनी प्रसिद्ध नियतकालिकांसाठी अनेक शोधनिबंध आणि शहरी वाहतूक, शहरी नियोजन, चांगली आणि स्वच्छ हवा यावर लेख आणि पुस्तके लिहिली आहेत. वन्यजीव प्रेमी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर विश्वास ठेवणारी व्यक्ती म्हणून पर्यावरण क्षेत्रात ते कार्यरत असून सतत ऱ्हास होत असलेल्या खेळाच्या मैदानांच्या प्रश्नांबाबत विकास क्षेत्रामध्ये काम करण्यास त्यांचे स्वारस्य आहे.

संस्थेची सूत्रे हाती घेताना पै म्हणाले, "अलीकडील आयपीसीसी अहवाल आपल्याला हवामान बदलाचे सर्वात वाईट परिणाम टाळण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आवाहन करतो. यामुळे २०७० पर्यंत नेट झिरो ही स्थिती गाठण्याप्रती असलेल्या भारताच्या बांधिलकीचे समर्थन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपल्याला ऊर्जा प्रणाली, अन्न प्रणाली आणि शहरीकरणाकडे असलेला आपला सध्याचा दृष्टीकोन बदलण्याची आवश्यकता आहे. डब्ल्यूआरआय इंडिया मध्ये आम्ही उच्च दर्जाचे कामकाज आणि संशोधन आणून आणि खाजगी क्षेत्र, समविचारी आणि समाजात काम करणाऱ्या संस्था यांच्याशी भागीदारीत काम करून या प्रणालीतील बदलांना चालना देण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य सरकारांना पाठिंबा देण्याकरता बांधील आहोत."

पै यांनी मुंबई विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवी संपादन केली आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथून परिवहन नियोजन विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. ते मुंबईत स्थित असून १९ एप्रिल २०२३ रोजी संस्थेत सीईओ म्हणून रुजू झाले.


माध्यम संपर्क:

नित्या कौशिक, डब्ल्यूआरआय इंडिया 9819902763, nitya.kaushik@wri.org


Read the English press release here.

Read the Hindi press release here.

Read the Kannada press release here.


About WRI India

WRI India, an independent charity legally registered as the India Resources Trust, provides objective information and practical proposals to foster environmentally sound and socially equitable development. Our work focuses on building sustainable and liveable cities and working towards a low carbon economy. Through research, analysis, and recommendations, WRI India puts ideas into action to build transformative solutions to protect the earth, promote livelihoods, and enhance human well-being. We are inspired by and associated with World Resources Institute (WRI), a global research organization with more than 400 experts and other staff around the world.

Stay Connected

Sign up for our newsletters

Get the latest commentary, upcoming events, publications, and multimedia resources. Sign up for the monthly WRI India Digest.